Wednesday, April 23, 2008

बंडाचे झेंडे-भुजबळ,राणे आणि आता मुंडे!!


गोपिनाथ मुंडे यांनी दिलेल्या तडकाफ़डकी राजीनाम्याने भाजपामधेही बंड झाले. हल्ली राजकिय बंड ही गोष्ट सामान्य होत चालली आहे. आपल्याला काहीतरी मिळाव या हेतुने बंड करायच,काहीतरी चटपटीत बातमी मिळायच्या सतत प्रतिक्षेत असलेला मिडीया मग गल्लीपासुन दिल्लिपर्यंत बंड ,त्याचे परीणाम,बंडाने भविष्यात होणारे बदल आणि सर्वात महत्वाच म्हणजे बंडखोर नेता पक्ष सोडणार का व सोडल्यास कुठे जाणार या चर्चा करुन काथ्याकुट करणार हे हल्ली नित्याचच व्हायला लागलय. बंड करण्यामागे 'असु शकणारी कुटनिती' पण चर्चिली जातेच.

बाकी महाराष्ट्राला राजकिय बंड काही नविन नाही. शरद पवारांनी कॉंग्रेसविरुध्द दोन वेळा केलेल,भुजबळांनी सेनेविरुध्द केलेल,विलासराव व सुशिलकुमारांनी पवारांविरुध्द केलेल,राणेंनी व राजनी उध्दवविरुध्द केलेल, अस प्रत्येक राजकिय बंड महाराष्ट्राची राजकिय भुमी हादरवुन गेल. काही बंड सफ़ल तर काही असफ़ल ठरले. पण आपण सध्या फ़क्त गेल्या काही महिन्यात झालेल्या बंडांचा विचार करु. ज्यामधे छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाला केलेल बंड,नारायण राणेंनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरुध्द केलेल आणि परवाच गोपिनाथ मुंडेंनी गडकरींच्या 'किचन कॅबिनेट'विरुध्द केलेल बंड येत. तसेच गेल्या काही महिन्यात दत्ता मेघेंच,कर्नल सुधिर सावंतांच,वैभव नाईकांच वगैरे 'चिल्लर' बंडही झाले.

बाकी महत्वाच्या ३ बंडांमधे फ़क्त मुंडेंचच बंड तस सफ़ल ठरल. भुजबळांनी स्वत:च्या वाढदिवसाला मुंडेंबरोबर कार्यक्रम घेउन व त्यात बाळासाहेबांचे फ़ोटो व शिवसेनेचा काळ वगैरेची आठवण काढुन अघोषित बंडाळी केली. पण नंतर डाळ काही शिजत नाही आणि पवार काही ऐकत नाहीत हे कळल्याने भुजबळ गप्प झाले. पवारांशी पंगा घेण परवडणार नाही हे काय आता भुजबळांना माहीत नसेल का?आधीच शिवसेना विरोधात,कॉंग्रेसशी निष्ठा न दाखवल्याने तिथेही अवघड,त्यात परत राष्ट्रवादीही विरोधात गेली तर आपल राजकीय अस्तित्वच धोक्यात येउ शकत हे माहीत असुनही भुजबळांनी 'नो बाईट ओन्ली फ़ाईट' वगैरे बरळत 'राजकिय भुकंपाचे' तारे तोडले. पण पवारांच्या एका धमकीनेच हे 'तारे जमिन पर' खो गये. बरं आता लढाई करायचीही धमक नाही तर उगच 'लौंगीची लड' फ़ोडुन 'तोफ़खान्याच्या' गर्जना करायच्याच कशाला??बाकी भुजबळांची धुसमुस अधुन-मधुन चालुच असते. त्यात परत बिहार,राजस्थानातल शक्तीप्रदर्शन असत. तिथल्या शक्तीप्रदर्शनाला तिथे कोणी विचारत नाही तर इथे कोण विचारणार???

त्यानंतरच बंड म्हणजे नारायण राणेंनी 'दिल्ली'त जाउन विलासरावांविरुध्द केलेल. हे बंड गुजरातच्या निवडणुकांच्या निकालांच्या एक दिवस आधी करण्यात आल. महाराष्ट्र सरकार जनतेसाठी नाही तर फ़क्त एका व्यक्तीसाठी चालते आहे असे म्हणुन राणेंनी 'सिंहगर्जना' केली आणि वर मी महाराष्ट्राच्या १० कोटी जनतेसाठी बोलतोय वगैरे अस पिल्लुही सोडुन दिल. महाराष्ट्राच्या १० कोटी जनतेची राणेंना काळजी आहे हा 'नविन शोध' कुणालाच पटला नाही. बाकी मागे आपण काय बोललो वगैरेचा विचार न करता काहीही 'ठोकायच' हा राणेंचा स्वभावच आहे. आपण केलेल्या विधानाच्या बरोबर विरुध्द विधान करताना राणेंना काहीच वाटत नाही. बाकी राणेंनी बंड गुजरातच्या निकालांच्या पार्श्वभुमिवर केले होते. मिडीयाने 'मोदी हरु शकतात' असा केलेला प्रचार बहुतेक राणेंना खरा वाटला असावा. कारण मोदी हरले तर ते भाजपातुन फ़ुटुन आलेल्या मोदीविरोधकांमुळेच असे स्पष्ट झाले असते व निष्ठावंतांपेक्षा कॉंग्रेसला पक्षांतर करुन आलेले 'पॉवरफ़ुल' नेते विजय मिळावुन देउ शकतात असे स्पष्ट होउन महाराष्ट्रात 'आपला नंबर' लागेल असे राणेंना वाटले असावे. बाकी राणेंच्या बंडामुळे प्रभा राव या त्यांच्या समर्थकही उघडपणे त्यांच्या विरोधात गेल्या.पतंगरावांनी हाच 'चान्स' साधायचा प्रयत्न केला व राणेंना 'कॉंग्रेसी संस्कृती'चे धडे दिले. बाकी पतंगराव शिक्षणसम्राट असल्याने 'धडे' देणे त्यांना जमते.गुजरातच्या निकालांनंतर 'उपर्‍यांना' मोदींनी झोपवल्याने राणेंचे बंड सफ़ल होण्याचा प्रश्नच उरला नाही व हायकमांडनी राणेंना गप्प केले. पण गप्प झाले तर ते राणे कसले. ते अजुनही दर १० दिवसांनी 'दिल्लीवार्‍या' करतात व दर वारीला मुख्यमंत्री बदलणार अशी अफ़वा उठवुन देतात. पण राणे ताकदवान,धडाडीचे आणि कुटनितीचा अचुक वापर करणारे असल्याने विलासरावांना आज नाही तर उद्या त्यांचा त्रास होणारच आहे.

त्यानंतर परवाच झालेले मुंडेंचे बंड. गडकरी आणि मुंडेंमधले मतभेद पुर्वीपासुन सर्वश्रुत आहेत. गडकरींनी त्यांच्या मंत्रीकाळात रस्तेक्रांती आणली होती,उड्डाण पुल बनवले होते त्यामुळे 'गुड एॅडमिनिस्ट्रेटर' म्हणुन त्यांची ओळख आहे पण त्यांना तसा फ़ारसा 'मास बेस' नाही. मुंडे त्यामानाने 'पॉप्युलर' नेते आहेत. महाजन-मुंडेंमुळे महाराष्ट्रात आज भाजपाच अस्तित्व आहे.पण महाजनांच्या निधनानंतर मुंडेंची चांगलीच अवहेलना चालली होती. त्यांना निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नव्हते.त्यामुळे मुंडेंनी बंडाचे हत्यार उपसले व 'भाजपात लोकशाही राहीली नाही' असे म्हणुन 'किचन कॅबिनेट' सगळे निर्णय घेते म्हणुन सर्व पदांचे राजीनामे दिले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भरभरुन राजीनामे दिले. निवडुन आलेले बहुतेक नेते मुंडेसमर्थक निघाले.मुंडेंनी पहिल्या दिवशी दिल्लीला जाण्यासही नकार दिला. शेवटी आडवानींनी समजुत घातल्यावर मुंडेंनी जास्त नाटक न करता राजीनामे मागे घेतले. या बंडामुळे मुंडेंना 'राष्ट्रीय नेता'च्या नावाखाली महाराष्ट्रातुन संपवण्याचा गडकरींचा डाव मोडीत निघेल असे दिसते. पण निवडणुकांमधे या मतभेदांचा फ़टकाही भाजपाला बसु शकतो.बाकी मुंडेंचे बंड यशस्वी झाले असे प्रथमदर्शी तरी दिसते. मुंडेंची पक्ष सोडायची इच्छा आहे असे कधी वाटले नाही. आपले राजकीय वजन कमी होउ नये म्हणुन मुंडेंनी वेळीच पाउल उचलले.

बाकी वरीलपैकी एकाही बंडाशी जनतेला घेणदेण नाही. जनता इथे कुठेही येत नाही. वैयक्तीक राजकीय स्वार्थासाठी नेते स्वत:च्याच पक्षाविरुध्द बंड करतात पण जनतेसाठी स्वत:च्याच पक्षाविरुध्द 'आर या पार'ची लढाई करणारा नेता दिसत नाही हेच महाराष्ट्राचे व या देशाचे दुर्दैव आहे.

Thursday, March 6, 2008

शिवसेनेचा मराठी बाणा -सोईचा की सच्चा???




Mr।M-संजय निरूपम, चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी, मुकेश पटेल, राम जेठमलानी इ. अमराठ्यांना राज्यसभेत खासदार करताना आणि उत्तर भारतीयांचे मेळावे आयोजित करताना, ठाकर्‍यांचा हा मराठी बाणा कुठे गेला होता? करूणानिधी कायम तामिळ भाषेत बोलतात. आजवर कधीही त्यांना तामिळव्यतिरिक्त इतर भाषेत बोलताना पाहिले नाही. ठाकर्‍यांनी मात्र अनेक वेळा हिंदी व इंग्लिशमध्ये मुलाखती दिलेल्या आहेत. तेव्हा कुठे जातो मराठी बाणा? "दोपहर का सामना" हे हिंदी सायंवृत्तपत्र काढून ठाकर्‍यांनी संजय निरूपमला त्याचे संपादक केले होते. हा सुद्धा मराठी बाणा आहे का?





Me(Mr।J)-अहो Mr.M तो करुणानिधी हिंदी,इंग्रजी बोलत नाही कारण त्याला दोन्हिही भाषा येत नाहित. तो अडाणी आहे हो. त्याची मुलगी मात्र इंग्रजी बोलते. त्याने मागे सरळ सरळ LTTE च्या एका महत्वाच्या अतिरेक्याला श्रीलंकन सरकारने मारल्यावर हळहळ व्यक्त करत तु किति ग्रेट होतास अशी अतिरेक्याबद्दल कविता लिहिली होती. आता अशा माणसाला इतर नेत्यांनी का फ़ॉलो कराव??? Mr.M ना बहुतेक करुणानिधी फ़ार आवडतो. आता हेही वाचा-मटातील बातमीचा काही भाग


मुंबईतल्या टॅक्सींची संख्या- सुमारे ५२ हजार


* मुंबईत टॅक्सी परमीट असलेल्या मराठी माणसांची संख्या-सुमारे २० ते २२ हजार। त्यातील दहा हजार मराठी माणसे स्वत: टॅक्सी चालवतात। *


' अजिंक्यतारा' ग्रुपमध्ये सहाशे मराठी टॅक्सी चालक। जुन्नर, कोल्हापूर, चाकणची मंडळी टॅक्सीच्या व्यवसायात *


मराठी तरुणांना टॅक्सी व्यवसायात आणण्यासाठी शिवसेनाप्रणीत ' मुंबई टॅक्सी चालक मालक सेना' संघटना कार्यरत *


शिवसेना आमदार डॉ। दीपक सावंत व सरचिटणीस दिलीप तम्मल मराठी टक्का वाढवण्यासाठी प्रयत्नशील


Mr. M,-मला करूणानिधिबद्दल अजिबात प्रेम नाही। किंबहुना त्याचा २४ तास काळा चष्मा घातलेला चेहरा, त्याचे लुंगी स्टाईलने नेसलेले धोतर (सगळेच दाक्षिणात्य - अगदी पी. चिदम्बरम सारखे शिकलेले सुद्धा, त्या विचित्र धोतर-कम-लुन्गीमध्ये वावरतात आणि त्याची त्यांना काही खंतदेखील वाटत नाही.), रामसेतूसंदर्भात त्याने प्रभु श्रीरामांवर केलेल्या आचरट कोट्या या सर्वांचा मला अतिशय संताप येतो. परंतु त्याच्या कर्मठपणामुळेच हिंदिला तामिळनाडूमध्ये शिरकाव करता आलेला नाही व तामिळ भाषा जिवंत राहिली आहे हे नाकारता येईल का? तामिळनाडूमध्ये हिंदिला अघोषित बंदी असल्यामुळेच मद्रासची मुंबई किंवा पुणे झालेले नाही. त्यामुळे बिहारि आणि भय्यांना तामिळ संस्कृतीवर आपल्या संस्कृतीचे आक्रमण करता आलेले नाही. तामिळ खासदार तामिळनाडूच्या प्रश्नावर पक्षभेद विसरून कायम एकत्र येतात. तामिळनाडूतून विधानसभेत, लोकसभेत किंवा राज्यसभेत अतामिळ कधीच निवडून येत नाही. करूणानिधि व तामिळांकडून मराठी लोकांनी हे शिकले पाहिजे. ठाकरे व शिवसेना यांचे मराठी प्रेम बेगडी आहे हे दाखविण्यासाठी मी वरील उदाहरणे दिली. त्यांची उक्ती व कृती वेगळी आहे. राज ठाकरेला जेव्हा २-३ तासांसाठी लुटुपुटीची अटक झाली तेव्हा त्याने त्याचा न्यायालयात बचाव करण्यासाठी एकूण ७ वकील नेमले होते. त्यापैकी ४ जण अमराठी होते. मुंबईत मराठी वकिलांची वानवा आहे का? तेव्हा कुठे गेला त्याचा मराठी बाणा? ठाकर्‍यांची मुले, नातवंडे इंग्रजी शाळेत शिकतात. याला मराठी बाणा म्हणायचे का?





Mr।S-संसदेत मागील दरवाज्याने प्रवेश घेण्यासाठी जे इच्छुक असतात त्यांना बहुतेक वेळी राज्यसभा उमेदवारी हवी असते. त्यामुळे अमराठी लोकांना उमेदवारी देताना त्यामागे शिवसेनेचे काही अर्थ कारण अथवा राज कारण असु शकते. परंतु याच शिवसेनेने मुंबै महापालीकेच्या मागील ३ निवडणुकांमध्ये १०० टक्के मराठी उमेदवार दिले होते. याचे कुणालाच कौतुक नाही.





Me- <<संजय निरूपम, चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी, मुकेश पटेल, राम जेठमलानी>>
Mr.S तुमच बरोबर आहे. Mr. M नी वरिल अमराठींना राज्यसभेत पाठवण्याचा विरोध केला होता. यापैकी राम जेठमलानी व चंद्रिका केनिया यांना भाजपच्या मागणीवरुन राज्यसभेत पाठवण्यात आले होते. संजय निरुपम सेनेत असताना सेनेचा आवाज घुमवायचा,स्वत्: अमराठी असुन भुमिपुत्रांसाठी बोलायचा. राज्यसभेत पाठवण्यामागे बर्‍याचदा राजकारण असते. सेनेनी पुर्वीच स्पष्ट केलय की ९४पुर्वी जे मुंबईत आलेत ते मुंबईकर आहेत. मग त्या वेळी तुम्ही लोकांनी का विरोध केला नाही???राजच म्हणाल तर त्याने फ़क्त भैय्यांना विरोध केलाय सर्व अमराठी लोकांना नाही. तामिळी लोकांची परिस्थीती वेगळी आहे. एक म्हणजे भौगोलिक रित्या ते हिंदी भाषीक प्रदेशापासुन दुर आहेत. दुसर म्हणजे त्यांची भाषा हिंदी भाषेपेक्षा खुप वेगळी आहे(आपली फ़ारशी वेगळी नाही). त्यांच्यासाठी तमीळ ही पहीली ओळख आहे(आपल्यासाठी भारतिय,हिंदु,धर्मनिरपेक्ष या पहिल्या ओळखी आहेत). द्रविडी राजकारण फ़ाळणीवादी होते तर आपले टिळक,सावरकर,राजगुरु इत्यादी भारत जोडण्यासाठी उत्सुक होते. तामीळी लोकांमधे आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत,आमची भाषा जगातील बोलली जाणारी सर्वात प्राचीन भाषा आहे याचा फ़ाजील आत्मविश्वास आहे जो आपल्यात नाही. तमिळनाडूत सर्वपक्षिय लोक तमिळ लोकांसाठी एकत्र येतात तर आपल्याकडे फ़क्त शिवसेना,मनसे मराठी साठी बोलतात. अशा वेळी अमराठी मते मिळवण्यासाठी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप त्यांना साथ देत नाहीत. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांचा मराठी बाणा सोईचा असे म्हणनार्‍यांनी आधी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप यांना विरोध करायला हवा कारण ते कधीच मराठीसाठी बोलत नाहीत. असे असुनही तामीळी चित्रपटांमधे अतामिळी हिरो-हिरॉइन्स भरपुर आहेत. बर्‍याच हिरॉइन्स हिंदीभाषीक आहेत. शिवाय सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात अतामिळी लोक चेन्नईत वाढत आहेत पण माहीती तंत्रज्ञानात त्यांचे राज्य मागे पडू नये म्हणुन तामिळी नेते त्यांना विरोध करत नाहीत.



Mr.M-<<आपल्यासाठी भारतिय,हिंदु,धर्मनिरपेक्ष या पहिल्या ओळखी आहेत)। >>हिंदू आणि धर्मनिरपेक्ष यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही. एकवेळ स्वतःला हिंदू म्हणणारे धर्मनिरपेक्ष या संबोधनाला फारसा विरोध करणार नाहीत. पण स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍यांना हिंदू हा शब्द म्हणजे कुणीतरी शिवी हासडल्यासारखे वाटते. <<तमिळनाडूत सर्वपक्षिय लोक तमिळ लोकांसाठी एकत्र येतात तर आपल्याकडे फ़क्त शिवसेना,मनसे मराठी साठी बोलतात. अशा वेळी अमराठी मते मिळवण्यासाठी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप त्यांना साथ देत नाहीत. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांचा मराठी बाणा सोईचा असे म्हणनार्‍यांनी आधी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप यांना विरोध करायला हवा कारण ते कधीच मराठीसाठी बोलत नाहीत. >>शिवसेना सोडून इतर पक्ष मराठी लोकांसाठी काही बोलत नाहीत व काही कृतीही करत नाहीत. शिवसेनावाले फक्त बोलतात, पण कृती बरोबर विरूद्ध असते. नुसते बोलून काही कृती न करण्यापेक्षा न बोलणारे व कृती न करणारे कमी फसवणारे नाहीत का? <<संसदेत मागील दरवाज्याने प्रवेश घेण्यासाठी जे इच्छुक असतात त्यांना बहुतेक वेळी राज्यसभा उमेदवारी हवी असते. त्यामुळे अमराठी लोकांना उमेदवारी देताना त्यामागे शिवसेनेचे काही अर्थ कारण अथवा राज कारण असु शकते. परंतु याच शिवसेनेने मुंबै महापालीकेच्या मागील ३ निवडणुकांमध्ये १०० टक्के मराठी उमेदवार दिले होते. याचे कुणालाच कौतुक नाही.>> पूर्वी बाबासाहेब भोसल्यांनी जाहीरपणे सांगितले होते की राज्यसभेच्या उमेदवारीसाठी त्यांना २५ लाख रूपये शिवसेनेने मागितले होते. त्यांनी ते न दिल्यामुळे कोणत्यातरी अमराठीला (मुकेश पटेल किंवा प्रीतीश नंदी असावा) ते तिकिट मिळाले. वा रे मराठी बाणा! शिवसेनेने मराठी उमेदवार दिले यात काही विशेष नाही. त्यांनी अमराठी उमेदवार दिले तरी अमराठी मतदार कॉंग्रेसच्याच अमराठी उमेदवारांना मत देतील. भाजपने मुसलमानांचे कितीही लांगूलचालन केले तरी त्यांना मुस्लिमांची मते मिळत नाहीत. त्याचप्रमाणे शिवसेनेला अमराठ्यांची मते मिळत नाहीत. म्हणूनच मग १०० टक्के मराठी उमेदवार दिल्याचे नाटक करावे लागते तात्पर्य काय कोणताही पक्ष मराठी माणसांसाठी काहिही कृती करत नाही. इतर पक्ष बोलत सुद्धा नाहीत. शिवसेनावाले फक्त बोलतात व त्यामुळे काही लोकांच्या अपेक्षा उंचावतात. पण कृती मात्र शून्य आहे. न बोलून न करणार्‍यांपेक्षा नुसते बोलून न करणारे जास्त वाईट








Me-बोलुन कृती नाही वगैरे नाही. आणि कुठली कृती विरुध्द होती??तुम्ही दिलेल्या ५ पैकी २ लोकांना भाजपामुळे राज्यसभेत पाठवण्यात आले व एक तर सेनेचा स्वत्:चा नेता होता। राज्यसभेतील उमेदवारी मराठी बाणा नाही हे स्पष्ट करते मात्र महापालिकेतील १००% मराठी उमेदवारी मराठी बाणा आहे हे स्पष्ट करत नाही???हे असे double standards का???एकच नियम ठरवा-उमेदवारी मराठी बाणा स्पष्ट करते का नाही??हो असेल तर मपा मधिल उमेदवारी पण बघा आणि नाही असेल तर राज्यसभेतील उमेदवारी पण बघु नका।बाबासाहेब भोसल्यांनी कुठलिही गोष्ट म्हटली की ती बरोबर ठरते का??आणि जरी पैशाची मागणी केली असेल तरीही आज भारतात कुठला पक्ष आहे जो पैसे घेउन उमेदवारी देत नाही??मुंबैत आता फ़क्त १६% मराठी माणसे आहेत। त्यामुळे फ़क्त त्यांचीच मते सेनेला मिळत असती तर मुंबई महापालिकेत सेना निवडुन येउच शकली नसती। शिवसेनेने टॅक्सी ड्रायव्हर्समधे मराठी लोक आणावेत यासाठी केलेले प्रयत्न कालच्या इथे टाकलेल्या मटाच्या लेखात दिले होते। सेनेने मराठी तरुणांना खाद्यपदार्थाचे स्टॉल्स वगैरे टाकुन देण्यात मदत केली होती मात्र नंतर मराठी तरुणांनी ते स्टॉल्स भैयांना भाड्यानी दिले। सेनेनी शासनात आल्यावर अमराठी लोकांसाठी पर्मिट सिस्टिम आणली मग इतर सर्व पक्ष व न्यायव्यवस्थेने ते होउ दिले नाही। इतरही अनेक उदाहरणे आहेत। पण हे सगळे लक्षात न घेता बाळासाहेब हिंदी अथवा इंग्रजीत का बोलतात हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटतो. करुणानिधी एक अडाणी आहे म्हणुन काय सर्वांनीच अडाणी रहायच काय??त्याची मुलगी इंग्रजीत बोलते म्हणुन तमीळ भाषेवर संकट आलं काय??कलाम,जयललिता,चंद्राबाबु,देवेगौडा,चिदंबरम हे लोकही इंग्रजीत बोलतात मात्र त्यांच्या इंग्रजी बोलण्याने त्यांच्या भाषेचे नुकसान झाले आहे असे कोणाला कधीही वाटलेले नाही. मोदीनेही गुजराती अस्मिता आणली पण मोदी तर हिंदी बोलतच नाही तर हिंदीत भाषणही करतो. मुळात मराठी माणुस व भाषा वाचवायला काय रामबाण उपाय आहे हे आपल्याला माहित नाही. त्याचप्रमाणे सेना,मनसेलाही ते माहीत नाही. त्यांना ज्या गोष्टींमधुन मराठी माणुस,भाषा वाचेल असे वाटते त्या गोष्टी ते करतात. त्यांनी काय करायला नको पेक्षा काय करायला हव हे तुम्ही लोकांनी सुचवा(बाळासाहेबांनी इंग्रजीत बोलु नये म्हणु नका). <<हिंदू आणि धर्मनिरपेक्ष यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही.>> माझ म्हणन होत कि आपली पहिलि ओलख भारतिय अथवा हिंदु अथवा धर्मनिरपेक्ष अथवा इतर काही असते आणि त्यांची ती तमिळ असते





Mr.M-<< राज्यसभेतील उमेदवारी मराठी बाणा नाही हे स्पष्ट करते मात्र महापालिकेतील १००% मराठी उमेदवारी मराठी बाणा स्पष्ट करत नाही???हे असे double standards का???एकच नियम ठरवा-उमेदवारी मराठी बाणा स्पष्ट करते का नाही?? >> कुठे आहे? Standard एकच आहे। ते म्हणजे जो जास्त माल देईल त्याला उमेदवारी! फक्त शिवसेनाच नव्हे तर सर्व पक्षांचे हेच Standard आहे. पण हे Standard उघड दाखविता येत नाही. म्हणून मग कॉंग्रेसला निधर्मी बाणा, भाजपला हिंदू बाणा, शिवसेनेला मराठी बाणा असे बाणे दाखवावे लागतात. तुम्हाला अजून माझे बोलणे पूर्ण समजलेले दिसत नाही. कॉंग्रेसची धर्मनिरपेक्षता व भाजपचे हिंदुत्व जितके प्रामाणिक (किंवा अप्रामाणिक) आहे, तितकाच प्रामाणिक (किंवा अप्रामाणिक) शिवसेनेचा मराठी बाणा आहे.





Me-अहो Mr।M पैसाच जर स्टॅन्डर्ड असते तर त्यांनी मनपाच्या निवडणुकिलाही भैय्यांकडुन पैसे घेउन उमेदवारी दिली असती ना!!! असो जर सर्वच पार्ट्यांमधे फ़क्त पैसाच तिकिट मिळवण्यासाठी पुरेसा असेल तर मग फ़क्त सेनेलाच दोष देउ नका.





Mr।M-<< अहो Mr.M पैसाच जर स्टॅन्डर्ड असते तर त्यांनी मनपाच्या निवडणुकिलाही भैय्यांकडुन पैसे घेउन उमेदवारी दिली असती ना!!! >>भैय्यांकडून पैसे घेऊन उमेदवारी दिली तर, तथाकथित मराठी बाण्याबद्दल कशी बडबड करता येईल? त्यापेक्षा मराठी उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना उमेदवारी दिली तर एका दगडात दोन पक्षी! << असो जर सर्वच पार्ट्यांमधे फ़क्त पैसाच तिकिट मिळवण्यासाठी पुरेसा असेल तर मग फ़क्त सेनेलाच दोष देउ नका. >>माझी याआधीची पोस्ट्स् नीट वाचा. सेना, भाजप, कॉंग्रेस इ. सर्व पक्ष सारखेच आहेत असे मी म्हटले आहे. त्यांच्यात कोणताही गुणात्मक फरक नाही. फरक एवढाच आहे की त्यांची प्रत्येकाची जनतेला फसविण्याची वेगवेगळी theme आहे. शिवसेना मराठी बाणा या कारणासाठी मराठी उमेदवारांना तिकिट देते हा तुमचा भोळसटपणा म्हणायचा की अज्ञान!





Me-शिवसेनेमुळे मराठी बाणा जिवंत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्यामुळे मुंबईत मराठी माणुस फ़क्त १६% असुनही मराठी माणसाला महत्व आहे. त्यांची ४० वर्ष मराठी माणसची अस्मिता जागरुक ठेवली आहे. एके काळी मुंबईत मराठी चित्रपटांना चांगली चित्रपटगृह मिळत नसत त्यावेळी शिवसेनेनी त्यासाठी प्रयत्न करुन ती मिळवुन दिली याची आठवण दादा कोंडकेंनी अनेकदा सांगितली होती. बाकी राजला विरोध करण्याशिवाय सेनेकडे दुसरा पर्यायच नव्हता कारण ४० वर्ष प्रयत्न करुन जी वातावरणनिर्मिती त्यांनी केली ती राज़ ठाकरेनी रात्रीत हायजॅक केली. बाकी महाराष्ट्रासाठी राज व उध्दवने व्यक्तिगत भांडणे विसरुन एकत्र येण्यातच मराठी माणसाचे हीत आहे.

Sunday, February 17, 2008

FIGHTS BETWEEN RAJ THAKEREY'S MNS AND BHIYYAS

Following is the discussion about Raj Thakerey's MNS activists and bhaiyyas from UP and Bihar

Mr.S-जनाब मै भि पुना का हि रहने वाल हुन और अभि CA(USA) मै काम कर्ता हुं पेहेले हुम indian है समझ गये कल राज ठाकरे के गुन्डो ने ४ लोगोन के हाथ पाओं काट डाले जिस्मे एक lady भि है. क्या येह सहि है ????????????? कहि भि रहो .....remember this things we are all of first indian! ज़य हिन्द..


ME-i didn't support Raj's actions u can check last weeks posts in the community. we r all indians first- accepted!but india is multicultural. महाराष्ट्र कि अपनि एक सन्स्क्रिति है,अपनि भाषा है. अगर हम भारतिय है,तो हमने सभि भारतिय भाषओंका और सभि प्रांतोकी सन्स्कृति का सम्मान रखना चाहिये. पर भैयोंका कहेना ये है की सभी लोगों ने सिर्फ़ नॉर्थ इन्डिअन सन्स्कृति और भाषाका सम्मान रखना चाहिये. हम इसके विरोधमे है. आप USA मे है तो आप USA के लोगों के खिलाफ़ अगर जाने लगे,उनके खिलाफ़ गुन्डागर्दी करने लगे तो चलेगा क्या???नहि चलेगा. वैसेही महाराष्ट्र के खिलाफ़ हात उठेन्गे तो उसका जवाब भी मिलेगा. अभि कल आपने इतनी गालियां दियि क्यों??क्योंकि आपको दियि हुइ गालिय आपको पसंद नही आयी . आपने 'tit for tat' किया. similarly लाठिके बदले तलवार ये भि 'tit for tat' है. आप लोग हमें कहते है कि सहिष्णुता दिखाइये लेकिन खुद गालिगलोच करते हुए सहिष्णुता का पालन नहि करते.भारतिय संविधान ये केहता है कि कोइ भी आदमी कही भी जा सकता है लेकीन वही संविधान ये भी कहता है की जब कोइ स्थलांतर करे तो उसने उस जगहकी local लोगोंको ,भुमिपुत्रोंको disturb नही करना चाहिये. इसके बारेंमे आप लोग क्या कहते है???

Mr.S-yes you are right our country is multicultural. रही बात संस्कृती और भाषा की तो मैने हमेशा सभी का respect किया है. वैसे आपने महाराष्ट्र की सन्स्कृती और भाषा की बात कि है तो मै आपको एक बात बताना चाहता हुं :--- महाराष्ट्र की regionall language है मरठी और यहां के लोग मराठा को अपना पुर्वज मानते है अगर येह सच है तो क्या कहती है मराठा की सन्स्कृती क्या राज ठाकरे को पता भी है? मराठा लोग दुसरों की इज्जत बचाने के लिये अपनी जान तक दे देते थे लेकिन ११ फ़ेब २००८ को कुर्ला में क्या हुआ राज ठाकरे के आदमियों ने एक बिहार की लडकी कि इज्जत लूट ली ये मै नही कह रहा कुर्ला पोलिस स्टेशन incharge का कहना है police incharge ने खुद येह accept किया है..

मराठा ने दुसरे राजाओं की भी जाकर हेल्प की और अन्ग्रेजो को यहां से भगाया टूटे हुए area को मिलाया लोगोन से एक साथ रहने कि बात कहि. मराठा लोगोन ने कभी अपनी पर्वाह नहि की हुमेशा दुसरों के हेल्प ही किया करते थे लेकिन कल नासिक मैं क्या हुआ राज ठाकरे के आदमियों ने एक मराठी engineer(worked in HAL) को ही मार डाला इन लोगोन ने अपने ही लोगो को मार डाला क्यों ???? उसके बाद १४ फ़ेब २००८ in evening at 5:30 PM राज ठाकरे का ये statement-“पिछले कुछ महीनों से पार्टी भीषण आर्थिक संकट से गुजर रही थी। कोई कार्यक्रमकरने के लिए कार्यकर्ता किसी उद्योगपति या व्यवसायी के पास एक रुपया भी मांगने जाए तो उसे दस पैसे देकर निपटा दिया जाता था। उन्हें उम्मीद है कि मनसे के पिछले दस दिनों में दिखे तेवरों के कारण अब स्थिति बदल चुकी होगी। अब बिना मांगे भी लोग मनसे को पार्टी फंड देने में कोताही नहीं करेंगे। ”
राज ठाकरे क्या चाहता है ये आपको भी पता है जरा ध्यान दिजिये इनके statement पे.
अब बात आति है language कि तो मराठी,बिहारी,भोजपुरी,मथिलि,कन्नड,तमिल,तेलुगु….इत्यादी.
ये सब reginal language है हमारी मातृ भाषा या mother tongue हिन्दि है ये सबको पता है. राज ठाकरे चाहते है की हर जगह मराठी हो महाराष्ट्र में तो वहां जयललीता चाहती है हर जगह तमिल हो , ज्योती बसु चाहते है हर जगह बेंगाली हो ….इसि तरह सभि लोगोन कि अपनी अपनी बात ….ये कभी possible नही होगा ये आपको भी पता है. एक को मानिये तो दुसरा नाराज़ हो जाता है आखिर आप कितनो को मनायेंगे जब तक लोग खुद नहि इस बात को समझेंगे कुछ नहि हो सकता.
मेंने जो कुच भी बोला वो सिर्फ़ राज ठाकरे को बोला किसि महाराष्ट्र के public को नहि….किसि भि प्रॉब्लेम का solutions झगडा नहि है अगर ऐसा होता तो आप क्यों study के लिये other country को जाते क्या आपका मन नहि करता की आप भि अपने family के साथ अपने native place मै होते

मैने communities मैं ये message भि पोस्ट किया था राज ठाकरे कि सोचन सहि है but मार पीट कर भगा देना १२ फ़ेब २००८ एक pregnant lady को जबरदस्ती train मैं धक्का दिया गया कुछ समय बाद train में ही delivery हुइ कितनी शरम कि बात है जिस ने हमे जनम दिया हमने उसके साथ क्या किया ??? जिसके वजह से हमरा वजूद है हमने उसी का रेप कर डाला ये कहां का इन्साफ़ है ?????????? रहि बात festival कि तो क्या आप परदेस मैं गणपति फ़ेस्टिवल मनायेंगे तो क्या वहां के सन्स्कृती को नुकसान होगा?? बिल्कुल नहि अगर कोइ कहता है तो वो politics कर रहा है और कुछ नहि राज ठाकरे ने बिहार के फ़ेस्टिवल छट के बारे मैं कहा था कि येह फ़ेस्टिवल नहि नौटन्कि है लोग नौटन्कि मैं शक्ति प्रदर्शन करते हैन …. अगर यहि बात कोइ गणपति फ़ेस्टिवल के बारे मैं कहे तो मुझे कैसा फ़ील होगा आप खुद बताइये ?अब बात आती है other state worker कि जो महाराष्ट्र मैं काम करते हैं…………

Approx १९८० or later धिरे धिरे महाराष्ट्र का development शुरु हुआ था. उसके पेहले और उस समय UP और बिहार का काफ़ि नाम था पटना university को west Cambridge university कहा जाता था मैं १५ professor को जानता हुं जो basically maharastra से belong करते हैन लेकिन उस वक्त महाराष्ट्र मैं अपनी property sale करके पटना मैं जाकर shift हो गये महाराश्ट्र मैं जिनके पास काफ़ी पैसा था वो लोग abroad चले गये थे
महाराष्ट्र के Development के लिये UP और बिहार से labour बुलाये गये क्योंकि ये लोग कम पैसे मैं भि काम करने को तैयार थे. जब महाराष्ट्र कि development हो रहा था तब सबको इनकि जरूरत थी अब जबकी महाराष्ट्र develop हो गया तो लोगो के हाथ पाओं काट दिये गये येह rumour नहि reality है क्योंकि जिसके हाथ काटा गया उसका भाई भी वहिं पिटा जा रहा था अभि दोनो गोरखपुर हॉस्पिटल मैं admit हैं.

मुझे गुस्सा सिर्फ़ इस बात को लेकर है कि ये खुन खराबा क्यों क्या आपक blood का रंग कुछ और है ?????? कहते हैं history अपने आपको repeat करता है थोडा imagine किजिये की अगर ऐसा हुआ तो फ़ीर क्या होगा… जो कुछ इनके साथ हो रहा है वही कल हम लोगो के साथ होगा और तब उस समय वो लोग भी अपने आपको सही prove करने मैं लगे होंगे जैसे अभि राज ठाकरे लगे हुए हैं. आप ही बताइये इस समय कौन disturbed है local public या outer public जिनका सबकुछ लूट गया. मैं २००२-२००५ IIT, मुंबै मैं था फ़िर Bangalore गया उसके बाद Singapore फ़ीर france, उसके बाद tokoyo मैं रहा अभी California ,USA मैं हुं मैं सबको कहता था हमारी मुम्बै जैस कोइ city नही है लेकिन आज मुझे अपने आप पे शरम आती है क्योंकि अपने लोग ही अपनो को पीट रहे है लोगो को आपस मैं लडान चाहते है जाती के नाम पे country को तोडना चाहते है. कोइ भी इन्सान बडा करम से होता है बडक्पन से नहि

अगर आपको मेरी कोइ बात बुरि लगि हो तो माफ़ी चाहता हुं मेरा मक्सद किसि के मान को ठेस पहुंचाने नही था . मैं तो सिर्फ़ इतना पुछना चाहता हुं की क्या आप अपने आने वाले generation को यही सब कुछ देना चाहते है क्या हम लोग एक साथ मिलकर नही रह सकते क्या educated होने के वावजूद हम दुसरे के दर्द को feel कर पाते हैं…..

Me-१)आपने जो लिखा है उसमे जो रेप कि बात हुइ है,या pregnant औरतकि बात हुइ है,या फ़िर हात काटनेकि बात हुइ है वो सब rumours है. उसका MNS के आंदोलनसे लेनादेना नहि है. हां कल नासिक मैं एक मराठि आदमिकि मौत MNS कि बजहसे हुइ है.दुसरि बात येह है कि mediaने इस issueको जरुरतसे ज्यादा बडा बनाया है,मैने मुम्बै रेहेने वालोंको पुछा था पर उन्होने कहा है कि situation इतनिभि बुरि नहि है जितनि mediaवाले दिखा रहे है. इन लोगों ने अपना पेट भरनेके लिये ऐसा माहोल पैदा किया जैसे की गुजरात जैसे दंगे हो रहे है या फ़िर महाराष्ट्र जल रहा है. वास्तविकता वैसी नही है. कै सारे मराठि newspapers ने इसका जिक्र किया है कि real situation ऐसी नही है,मराठि newspapers वाले महाराष्ट्र को ज्यादा अच्छेसे जानते है,बल्कि mainstream media नही जानता(remember how mainstream totally miscalculated gujrat elections) same is happening here.

२)सबसे important मुद्दा येह है कि मैने राजका विरोध ही किया है. आप community के previous pages देख सकते है(आजके १०-१२ दिन पेहलेके). पर राजने जो मुद्दा उठया है वोह पुरि तरह baseless नहि है. और एक important बात है की मराठी to हिन्दि इन्ग्लिश translation मैं बहुत सारि चिज़े गलत लिखि गयि है. अभि आजके indian express मैं एक news है जो कि मराठि weekly ळोकप्रभा मैं छापि राजकि interviewके बारेमे है. उस newsमैं लिखा है कि राज खुदको jefferson,mahatma gandhi se compare करते है,constitution बदलनेकि मांग करते है वगैर वगैर. लेकिन असलमैं अगर आप वो interview पढे तो राज ने ऐस कुछ भि नहि कहा है. आपने जो राजका statement लिखा है वोह आपने कहांसे लिया है??plz give me link.

३)yes in history,we had really glorious history.forget other women even enemy women were given respect.छत्रपती शिवाजी महाराज अगर कोइ soldier दुश्मनकी औरतोंपर rape करता तो उसके हात काट डालते थे. इसकी बजहसे हमारे soldiersने कभीभी दुश्मनकि औरतें,धर्मग्रंथ,धर्मस्थल पर attack नही किया था(u can read incidence of Shivaji maharaj n kalyan's subhedar's daughter in law).

अगर इस आंदोलन मैं ऐस कुछ हुआ है तो वो बहुत बुरा है,और राज भी ऐसे लोगोंको support नही करेंगे.i must tell u MARATHI PEOPLE R STILL HAVING MARATHA BLOOD N RAPE OR DISRESPECT OF WOMEN WILL NEVER BE ACCEPTED BY MARATHI COMMUNITY.

४)हमारी मात्रुभाषा मराठि है और राष्ट्रभाषा हिन्दि है. all marathi people know hindi!!but people from south india,bengal don't know hindi.our point is that why nobody teaches them about hindi's gr8ness???why only marathi people r said to respect and speak hindi???we all know hindi.what we r sayin that because of hindi people r increasing in our state,our language is in trouble.if we won't do anything now,after some decades marathi will become extinct.something must be done 2 save marathi language.what we offer is all those who come 2 maharashtra should learn and speak marathi.u must speak tamil in tamilnadu,malyalam in kerala,telugu in andhra,RUSSIAN IN RUSSIA, FRENCH IN FRANCE N GERMAN IN GERMANY.what is wrong with that???

५)nobody says that marathi should be spoken throughout country,nobody says that tamil should be spoken in delhi or patna.ur information is absolutely wrong. what we say is once u come 2 maharashtra u should learn marathi.is it so difficult to learn a language??no absolutely not.i know 5 languages.there r many gujratis,marwaris ,jains in maharashtra but they learnt marathi,they spoke their language at home but socially they used and still use marathi.same is with marathis who live in gujrat for example.they know gujrati.this gives a very good message that outsider respects locals.

६)भैय्याओंके बारेमैं येही problem है की ऐस दिखता है की वोह मराठीको respect ही नही करते(कुछ exceptions होंगे). अभि एक UP के कॉर्पोरटर ने ऐसा प्रस्ताव लाया है कि BMC के व्यवहार हिन्दि मैं हो. इसकी क्या जरुरत है????और मैं आपको बताना चाहता हुं के आप कितना भी कहे लेकिन भैय्या लोग गुंडागर्दी बहुत करते है(सभी नही करते लेकिन जो नहि करते वोह करनेवालोंको नहि रोकते).शीला दिक्षित और delhi ke deputy governor ने भी येहि बात कहि है. अब इतने लोग केहते है तो वोह आरोप पुरि तरह baseless तो नहिं है.

७)सिधिसि बात है कि राजको सभि दुसरे मराठी नेताओने oppose किया लेकिन मराठी लोगोन के खिलाफ़ लाठिया देनेकी बात करनेवाले अबु आज़मी,अमर सिंघ के खिलाफ़ कोइ नही बोलता. ऊनके political opponents भी नही बोलते. क्यों मायावती नही बोली के समाजवादी पार्टी लाथिया देने की गलत बातें करके मराठी लोगोन के खिलाफ़ UP के लोगोन को भडका रहें है???क्योन mediaने येह बात नही उठाइ???तलवारके खिलाफ़ सब बोल रहे है लेकिन लाठिके बारेमैं कोइ नहि बोल्ता. लाठिया लायी तो तलवार लाओ ऐसा बोला गया था,अगर लाठि नहि आयेगी तो तलवार भि नहि आयेगि येह कोइ क्यों नही बोलता??

८)दुसरा मतलब festival.मैंनेभि mainstream की बात सुनके community पर येही मुद्दा कहा था कि आप छट पुजा को विरोध कैसे करते है??उसका विरोध कर्ते है तो ईद,ख्रिसमस का क्यों नही कर्ते???पर बादमैं जब मैने मराठी statements पढे तो वहां छट पुजाका कहिं भी विरोध नही किया था. महाराष्ट्र टाइम्स नामके newspaper मैं राज का article आया जिसमैं भी उन्होने येहि मुद्दा उठाया था के उन्होने छट पूजा को विरोध नही किया है.उन्होने विरोध इस बातका किया था के छट पुजा के नामपर बिहार,UP politicians आते है और मराठी लोगोंके खिलाफ़ भडकाने का ‘नाटक’ करते है. राजने छट पुजा का नही तो उसके नामपर चलने वाले गंदी politics का विरोध किय था.

९)महाराष्ट्र कि development ८०के बाद शुरु हुइ येह statement एकदम गलत है. महाराष्ट्र के formation के बादसे मुम्बै देशका industrial capital रहा है. हम हमेशा बिहार और UPसे आगे थे. पुना मैं देशकि first national school और college बनि थि और पुना को oxford of east अभिभि कहा जाता है और पेहेलेभि कहा जाता था. आपने पटना विद्यालय कि बात लिखि है उसके बरेंमैं मै कहुंगा की उन professors को उस university मैं अच्छी opportunities थी इस लिये वो वहन गये होंगे. महाराष्ट्र मैं १९८० के बादके कुछ साल मिल strike हुआ था उसकि बजहसे उल्टा कर्के बहुत problems हुए थे. महाराष्ट्र was developed even before 1980. अगर पटना ज्यादा developed होता तो वहां के लोग इतने कम पैसे मैं मुम्बै क्यों आते???indians कम पैसे मैं काम कर्ते है इस लिये उन्को US बुलाया जाता है,US के लोग यहां नही बुलाये जाते. क्योंकि उन्के यहां developement है,उन्हे कम पैसेमैं काम कर्नेकि क्या जरुरत है??both of ur statements r wrong.

१०)अभिभि मुम्बै सबसे अच्छि है,छोटीमोटी लडाइया mediaने बडी कियी है,उसकि बजहसे मुम्बैका स्पिरिट खतम नहि होगा. MNS separatist नहिं है,उन्होने देश तोडने कि कोइभी बात नही कही है. येह सब media creation है. everybody must remember one saying 'WHEN U GO TO ROME,DO AS THE ROMANS DO'.पर येह सब नहि होता अगर UP,Bihar मैं developement होता. मुझे कोइ hope नहि है क्योंकि bhaiyyas r mostly uneducated और उसका पुरा फ़ायदा अबु आज़मी वगैरा उठायेंगे. मराठी लोगोंकि अस्तित्व के लिये उनको भि जवाब देनाही पडेगा. हां,सबने मिलजुलकर रेहना चाहिये पर येह बात भैय्यओंको भि समझनि चाहिये कि महाराष्ट्र आकर यहंकेहि भुमिपुत्रोंके खिलाफ़ लाठिया बाटना गलत है. मुलायम ने तो कहां है कि भैय्याओने उनका विरोध करने वालोंके खिलाफ़ 'जिहाद' पुकारना चाहिये. अगर जिहाद होगा तो हमभी हातपर हात रखकर नही बैठ सक्ते ना???

११)मैं राजका विरोध करता हुं क्योंकि ऐसि मारामारी कर्के येह problem solve नही हो सक्ता, उसके लिये permit system लानि चाहिये जिसकि बजहसे जो मुम्बै कि समस्याये है उन्को solve किया जा सक्ता है. the city is in deep trouble as everyday around 300 families come 2 mumbai and BMC is not able to provide infrastructure to them.they r leaving in worst conditions in slums. बहुत सारे देशोंमैं ऐसी permit system है. even सिंगापूर के mayor जब मुम्बै आये थे तो उन्होने कहा था कि मुम्बै के development के लिये आनेवाले लोगों को रोकना चाहिये. राजने येह सब politics के लिये किया क्योंकि उध्दव ठाकरेने मोर्चा,आंदोलन करके जनताका आवाज़ उठाया था. मुम्बै मैं ULC के खिलाफ़,मेहेंगाई के खिलाफ़ बडे मोर्चे,विदर्भ मैं farmers के suicide को रोकने के लिये बडी बडी rallies कियि थी जिसके बजहसे लोग केहेने लगे थे कि उध्दव next CM बनेंगे. अभि येह मुद्दा उठाके अपना नाम आगे लानेके लिये राज ने येह किया है.